महाराष्ट्र
अर्ध्याहून अधिक मंत्री आका, तर देवेंद्र फडणवीस हे मोठे आका, बच्चू कडूंचा हल्लाबोल, मोदींवरही केली टीका
देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे हिंसाचाराच्या घटनेनंतर अडीच वर्षानंतर मणिपूरला गेले आहेत. हा नेपाळचा परिणाम आहे असे म्हणत बच्चू कडू यांनी टीका केली.
Bacchu Kadu : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे हिंसाचाराच्या घटनेनंतर अडीच वर्षानंतर मणिपूरला गेले आहेत. हा नेपाळचा परिणाम आहे. नरेंद्र मोदी यांना भीती वाटत आहे की आपलं घर जळू नये. स्वतःच्या घरावर वेळ आली तेव्हा मणिपूरची आठवण आली आहे दुसरं काही नाही असे म्हणत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी टीका केली. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. मंत्रीमंडातील अर्ध्याहून अधिक मंत्री आका आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे मोठे आका आहेत अशी टीका त्यांनी केली.





